मुंबई :- ठाकरे गटाच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या एका विधानामुळं भाजपधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? अशी चर्चा सुरू झाली आहे.
चित्रा वाघ आमदारकी न दिल्याने नाराज आहेत. त्यामुळे सोयीच्या मुद्द्यावर त्या चित्रविचित्र बोलत असतात. . सोयीच्या भूमिका मांडणाऱ्या चित्रा वाघ सध्या आमदारकी न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत अडकल्या आहेत , अशी बोचरी टीका शिवसेना उपनेत्या अंधारे यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
माध्यामांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “सारखं भाजपची बाजू लावून धरल्यावर भाजप आपल्याला आमदारकी देईल , असं चित्रा वाघ यांना वाटत होतं. पण त्यांचा अंदाज फेल गेला. त्यांना काय आमदारकी मिळाली नाही. त्यामुळे त्या निराशेच्या गर्तेत सापडल्या आहेत. भाजपने त्यांची आमदारकी डावलल्यानंतर त्या वाटेल त्या पद्धतीने बरळत राहतात.चित्रा वाघ चित्रविचित्र बोलत असतात. ते फार मनावर घेण्यासारखं नाही. त्या फक्त भाजपशी बांधिल राहून बोलतात. कारण या त्याच चित्रा वाघ आहेत ज्यांनी कठुआ, हाथरस उन्नाव प्रकरणी तोंड उघडलेलं नव्हतं. त्यामुळे अशा राजकीय रोजगार हमीचे मजूर म्हणून काम करणारे कार्यकर्ते आहेत, मला त्यांच्यावर फार बोलायचं नाही”, म्हणत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली.
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या ?
संभाजी भिडे जेव्हा टिकली लावण्याच्यासंदर्भाने बोलले तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना जोरदार विरोध दर्शवला, त्यांच्यावर टीका केली. मग त्याच सुप्रिया सुळे जेव्हा महिला पत्रकारांनी साडी नेसली पाहिजे, असं बोलतात, तेव्हा इतर मविआमधील महिला नेत्या का बोलत नाही? आता व्यक्तिस्वातंत्र्य आठवत नाही का? असा खडा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अंधारे यांनी वाघ यांची खिल्ली उडवली.
चित्रा वाघ नाराज ; भाजपमधील
अंतर्गत आला वाद चव्हाट्यावर
तुमच्या परिसरातील बातम्या
RELATED ARTICLES